बार्शी: भारतीय तत्त्वज्ञानातील मानवी जीवनात मी कोणीतरी सामान्य आहे हे मानणे हे विशेष तर आपण कोणीतरी विशेष आहोत असे मानणे हे सामान्य असून त्यासाठी तुकोबारायांनी लहानपण देगा देवा अशी प्रार्थना केली आहे. परमात्मा श्रीकृष्ण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी जगदीश्वर, सर्वज्ञ, सर्व विद्यासंपन्न, अमरज्ञानी आणि गुप्त स्वरुपात वावरणारे असूनही केवळ मानवीय संस्कार संपन्नतेसाठी ते बाळकृष्णाच्या रुपात अखेरपर्यंत राहिले असल्याचे ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांनी केले.
सालाबादप्रमाणे शनिवारी (दि.३ ऑगस्ट) ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांचे संपूर्ण श्रावण
महिनाभर शहरातील श्री भगवंत मंदिरात चालणा-या प्रवचनमालेचे दुसरे निरूपण सांगताना बोलत
होते. यावेळी श्रीकृष्ण लीला चिंतन (उत्तरार्ध) हा विषय चिंतनासाठी घेण्यात आला असून यंदाचे हे
१७ वे वर्ष आहे.
श्रीकृष्णाचे चरित्र अलौकिक आहे. मातेच्या उदरी पहिला, उपनयन संस्कार (मुंज) हा दुसरा
तर गुरूपदेश हा तिसरा जन्म मानला जातो. गुरू ही व्यक्ती नव्हे तत्त्व आहे, तो अमृताचा समुद्र आहे.
ते कृपाळू भबबंधन तोडणारे व अहंकाराची निवृत्ती करणारे असतात गुरूउपदेशाशिवाय जीवनाची
परिपूर्ती होत नसल्याने श्रीकृष्ण बलरामदादा समाबेत गुरूबिद्या घेण्यासाठी सांदिपनीच्या
आश्रमामध्ये दाखल झाले आणि सांदिपनी गुरू सुध्दा आपला गुरूपदेश योग्य शिष्याला दिला जावा
म्हणून चांगल्या शिष्याच्या शोधात होते. श्रीकृष्ण-बलरामानी या ठिकाणी १४ बिद्या, ६४ कला,
धर्मशास्त्र, योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र या सर्वांचे अध्ययन केले. त्यामध्ये ते निपुण झाले. आणि शेवटी
विद्याध्ययन पूर्ण करून सांदिपनी गुरूकडून श्रीकृष्णानी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला
माझ्या आईच्या हातचे भोजन मिळावे असा आशिर्वाद मिळविला असल्याचे बोधले महाराजांनी
शेवटी निदर्शनास आणून दिले.
तत्पूर्वी
सुरूवातीला कंस कोण होता ? त्याचा वध आणि कंस ही वृत्ती व्यक्ती नव्हे, मला काही कार्य
करावयाचे आहे या दृष्टिकोनातुन आपण श्रीकृष्ण लिलेचे चिंतन करणार असल्याचे गतवर्षीच्या
प्रवचनातील आढावा घेत यावेळच्या प्रवचनास सुरूवात केली.
प्रा.ह.भ.प.विलास जगदाळे यांनी पहिल्या दिवशीच्या प्रवचनारंभी आपल्या प्रास्ताविकात
संपूर्ण श्रावण महिनाभर चालणा-या प्रवचनामागील भूमिका स्पष्ट केली. तर यावेळी माजी आमदार
राजेंद्र राऊत यांनी तीर्थक्षेत्र विकास निधीतुन ग्रामदैवत श्री.भगवंत मंदिर परिसर सुशोभीकरण व श्री
भगवंताचे नित्योपासक वारक-यांना आवश्यक त्या सोईसुविधा पुरविण्यात येतील असे आश्वासन
दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, देवस्थान मंडळाचे सरपंच दादासाहेब बुडूख,
विश्वस्त आणि श्रोतृवृंद उपस्थित होता.