शेतीला पाणी मिळून शेतकरी कुटुंबाची प्रगती होऊन सधन व्हावीत हाच मुख्य अजेंडा – राजेंद्र राऊत
ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद
बार्शी: बार्शी तालुक्यासाठी बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण करणार असून या योजनेद्वारे तालुक्यातील अनेक गावांच्या शेतकरी बांधवांचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून, यामुळे त्यांचा फायदा होऊन ते शेतकरी बांधव नक्कीच प्रगती करून सधन होतील. कोणत्याही परिस्थितीत अर्धवट राहिलेली उपसासिंचन योजना मी पूर्ण करणारच अशी ग्वाही अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दिली.
ते श्रीपत पिंपरी येथे आयोजित कॉर्नर सभेत बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले अॅड. असिफभाई तांबोळी, संतोष दादा निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,ज्येष्ठ नेते कुंडलिकराव गायकवाड,केशव घोगरे,बाबासाहेब मोरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राऊत यांचे प्रचारानिमित्त फिरत असताना गावोगावी उत्साह पूर्ण स्वागत होत असून मतदारांचा व तरुणांचा चागला प्रतिसाद मिळत आहे.
मी स्वतः एक शेतकरी कुटुंबातील हाडाचा शेतकरी असून शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी मला ज्ञात आहेत. त्या सोडविण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील असतो व भविष्यातही राहणार आहे असेही ते म्हणाले.
त्याचबरोबर बार्शी तालुक्यात चिंचोली-ढेंबरेवाडी, रऊळगाव, संगमनेर, सुर्डी, मालेगाव या पाच साठवण तलावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करून या तलावांची निविदाही प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
बार्शी तालुक्यातील भोगावती व नागझरी नदीचे पुनरुज्जीवन करून या नदीवर 21 बंधारे बांधण्यात येणार असून त्यापैकी नऊ बंधाऱ्यांच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.
बार्शी तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी साठवण तलावाचे साईट्स उपलब्ध असतील त्या ठिकाणचा सर्वे करून त्याठिकाणी साठवण तलाव भविष्यातही केले जातील, जेणेकरून या साठवण तलाव मार्फत त्या क्षेत्रात येणाऱ्या त्या गावांना या साठवण तलावाच्या पाण्याचा लाभ होईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
ग्रामीण भागातील प्रत्येक गावच्या आसपास असलेल्या छोट्या नद्या,ओढे-नाले यांवर जास्तीत जास्त बंधारे बांधून त्याचा फायदा त्या गावातील शेतकरी बांधवांना नक्कीच होईल व त्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढून शेतकरी कुटुंब सधन होईल, यासाठी मी कायमस्वरूपी व नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे. माझ्या तालुक्यातील शेतकरी हा सधन झाला पाहिजे हे माझे स्वप्न आहे व त्यासाठी मी अहोरात्र झटत राहणार आहे.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले अॅड. असिफभाई तांबोळी, संतोष दादा निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,ज्येष्ठ नेते कुंडलिकराव गायकवाड,केशव घोगरे,बाबासाहेब मोरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi