शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, आमदाराचा दावा

मुंबई | विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही सत्ता स्थापन झालेली नाही. भाजप शिवसेनेचा सत्ता वाटपाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासह सर्व सत्तापदांचं समान वाटप करण्याची मागणी लावून धरली आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. यामुळे भाजपाकडून इतर मार्गांचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे.

शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा दावा रवी राणांकडून करण्यात आला आहे. ‘गेल्या 5 वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तमरित्या काम केले आहे. त्यांनी राज्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. त्यामुळे पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होणार असा विश्वास राणांनी व्यक्त केला आहे. आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासह आज राज्यपालांची भेट घेतली.

रवी राणा हे बडनेराचे आमदार झाले आहेत. निकालानंतर लगेचच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाठिंब्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेच्या आहेत. मात्र भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपाचं संख्याबळ 118 ते 120 पर्यंत पोहोचले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: