अमरावती । मुंबई, दिल्लीचे जे मुलं शिक्षण घेतात, तेच शिक्षण माझ्या गावच्या मुलाला मिळाले पाहिजे. यासाठी राज्यात शिक्षण क्षेत्राबाबत लवकरच नवीन धोरण अमलात आणणार असल्याचे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
शिक्षण क्षेत्रात मोठा घोळ असून, आदिवासींचे शिक्षण वेगळे, अपंगांचे शिक्षण वेगळे, महानगरपालिकेचे शिक्षण वेगळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण वेगळे, या सगळ्या रचनांमध्ये आम्ही शिक्षणाची कूरचना केली असून मुंबई, दिल्ली येथील मुलांना जे शिक्षण दिल्या जाते, तेच शिक्षण माझ्या गावातला मुलाला दिले गेले पाहिजे. तो जगाच्या व्यासपीठावर कसा तयार होईल व मजबूत होईल यासाठी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी नवीन धोरण आम्ही लवकरच आणणार आहोत. असे मत राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी अचलपूर येथील शिक्षण क्षेत्रातील एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले.