वाळव्यातील शैलजा व जयंत पाटील परिवार करतोय मनोभावे पूरग्रस्तांची सेवा,घरीच सुरू केले अन्नछत्र

सातारा व सांगली जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे कृष्णा – वारणा नद्यांना न भूतो न भविष्यती असा विशालकाय महापूर.. जिकडे तिकडे पाणीच पाणी. वाळवा तालुक्यातील असंख्य गावे पाण्याखाली गेली! हजारो कुटुंबे पुरात अडकली.. त्यांना पुरातून बाहेर काढण्याचे आव्हान आणि नंतर त्यांची सुरक्षित ठिकाणी निवासाची सोय हे एकीकडे घडत असतानाच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे हेही वाटते तेव्हडे सोपे काम नव्हते!

तालुक्याचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम अहोरात्र करत असतानाच त्यांच्या सौभाग्यवती शैलजादेवी पाटील अर्थात वहीनीनी मातेच्या ममतेने पूरग्रस्तांना जेवु घालण्याचे पवित्र काम आपल्या शिरावर घेतले.

हजारो पूरग्रस्त,त्यांची भूक ओळखून वहिनीनी हे अवघड आव्हान स्वीकारून आपल्या निवासस्थानी स्वयंपाकगृहच उघडले आणि जेवणाची हजारो पाकिटे तयार करून ती पूरग्रस्तांना पोहोच केली. गृहलक्ष्मी हि घर सांभाळणारी असावी असे म्हणतात..

या लक्ष्मीने अख्खा तालुका सांभाळण्याचा विडा उचलला आणि गृहलक्ष्मी ही कठीण प्रसंगात न डगमगता धाडसाने खंबीरपणाने उभी राहून दानशूरपणाचा आदर्श घालून देत ही माऊली हजारो भुकेल्यांसाठी अहोरात्र राबली.पाटील यांच्या विविध संस्थामधील कर्मचारी, स्वयंसेवक ,विद्यार्थी यांच्या मदतीने ही मोहीम राबवली.यामध्ये मुलगा प्रतीक याने ही हातभार लावला.

आमदार जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढले तर वहीनीनी या लोकांना पोटभर जेऊ घालण्याचे पवित्र काम केले. “प्रार्थना म्हणणाऱ्या ओठा पेक्षा मदत करणारे हात अधिक पवित्र असतात” म्हणूनच हजारो भुकेलेल्यांना स्वयंपाक करून जेऊ घालणाऱ्या त्यांच्या पवित्र हातांना सलाम!

केवळ पुरग्रस्तांनाच नव्हे तर पुणे – बंगळूर महामार्गावर दोन दिवस अडकून पडलेल्या वाहनधारकांना व प्रवाशांनाही वहिणीनी स्वतः कासेगावात जाऊन जेवण आणि पाणी दिले आणि प्रवाशांचीही आईच्या ममतेने काळजी घेतली. भुकेलेल्याची भूक ओळखून मी कोण आहे हे विसरून ममत्वाला जागून वहिणीनी वेळेचे भान ठेवून केलेले काम हे अलौकीकच आहे.

आ.जयंत पाटील यांच्या नियोजनात सौ.शैलजा जयंत पाटील यांनी दिवसभरात वाळवा तालुक्यातील पुरग्रस्थ गावात 6000  लोकांचे जेवणाचे किट बनवून दिले. तसेच वाघवाडी ते मालखेड या पुणे-बेंगलोर हायवेवर चक्काजाम झालेल्या ८०० वाहनधारकांना जेवणाचे किट वाटप केले. या भुकेलेल्या वाहनधारकांनी, ट्रक ड्रायव्हरांनी सौ.शैलजा जयंत पाटील यांना भेटून विशेष आभार मानले.

त्यांचे त्रिवार अभिनंदनच! आणि अशा गरजू लोकांसाठी जिद्दीने राबणाऱ्या वहिनी आम्हा वाळवेकरांना लाभल्या त्या तालुक्यातील मी एक भाग्यवंतच! अशा आदर्श वहिणीना आम्हा सर्वांचा मनाचा मुजरा!

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: