मुंबई । ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर देशभरात प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. सर्वच स्तरांतून या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक वर्षांचा लढा संपला याचं मला समाधान आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना निश्चितच गर्व वाटला असता. आजच्या निकालाच्या दिवशी बाळासाहेबांची आठवण देशभरातील नागरिकांना येणं स्वाभाविक आहे. कारण तो काळ असा होता जेव्हा या देशात लोक मी हिंदू आहे, हे म्हणायलाही घाबरत होते. तेव्हा बाळासाहेबांनीच सर्वांना गर्व से कहो हम हिंदू है, हा विश्वास दिला.
राम मंदिरासाठी जे शहीद झाले त्या सर्वांसमोर मी नतमस्तक होतो.
आंदोलनात सहभागी झालेले काही जण अजुनही आमच्यासोबत आहेत त्या सर्वांना मानाचा मुजरा
हा समजूतदारपणा दाखविल्यामुळे हिंदुस्थान एक महासत्ता बनेल हा मला विश्वास आहे.
या नव्या पर्वाचं आपण सर्वांनी चांगल्याप्रकारे स्वागत करूया
आनंद जरूर साजरा करा पण वेडंवाकडं काही करू नका
अशोक सिंघल, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांची ही आठवण होते
लवकरच लालकृष्ण आडवाणींची भेट घेणार, राम मंदिराच्या लढ्यात आडवाणींचे मोठे योगदान आहे.
येत्या 24 तारखेला मी पुन्हा अयोध्येला जाईन. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
मी येत्या दोन तीन दिवसात पुन्हा शिवनेरीला जाणार त्या पवित्र मातीला, शिवरायांना वंदन करणार
तिथे जाताना मी शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलेलो. ही चमत्कार घडवणारी माती नेल्यानंतर मला विश्वास होता की ही माती चमत्कार घडवेल. आणि वर्षभराच्या आत हा निकाल लागला.
आज 9 नोव्हेंबर आहे. गेल्या 24 नोव्हेंबरला मी अयोध्येत गेलो होतो.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते
आपल्या देशात मी हिंदू आहे हे बोलायला घाबरत होते तेव्हा शिवसेना प्रमुखांनी ते बळ त्यांना दिलं
न्यायव्यवस्थेचे आभार मानतो त्यांनी हा बरेच दिवस प्रलंबित असलेल्या खटल्यात न्याय मिळवून दिला.
गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद मिटला आहे.
सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस आहे.