मुंबई । राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. शिवसेनेन काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला आहे, त्यावर सविस्तर चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल अस मत यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी मांडले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण न देणं चुकीचं आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सहकारी पक्षांशी बोलणं आवश्यक आहे, त्यासाठी बैठक झाली, आधी आम्ही आमचं ठरवू, त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करु अस मत त्यांनी यावेळी मांडले. यावेळी बोलताना अहमद पटेल म्हणाले की राज्यपालांचं सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण नाही, हे चुकीचं आहे. आता राज्यपालांनी आम्हांला भरपूर वेळ दिला आहे, आम्ही निवांत निर्णय घेऊ अस मत यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडले. शिवसेनेने आमच्याशी कालच संपर्क साधला, त्यानंतर आम्ही तातडीने राष्ट्रवादीशी संपर्क केला, मग आम्ही चर्चेसाठी मुंबईत आलो, इथे आम्ही उशिर केला म्हणण्याला अर्थ काय? अस मत अहमद पटेल यांनी मांडले. काँग्रेस-राष्ट्रवादीचा तूर्तास शिवसेनेला पाठिंबा नाही, आधी आघाडीची चर्चा, मग शिवसेनेशी चर्चेचं ठरवणार. असल्याचेही मत यावेळी त्यांनी मांडले.
वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. दिल्लीवरून आलेले काँग्रेसचे अहमद पटेल यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारने मनमानी केल्याचे म्हटले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला आहे, त्यावर सविस्तर चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल.