ग्लोबल न्यूज– पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने राज्यातील लाॅकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. कोलकत्त्यातील निबान्ना येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली. तसेच राज्यातील लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत घेतला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या 14,728 इतकी आहे. पैकी 4,930 सक्रिय रुग्ण आहेत, तर 580 जणांचा मृत्यू झाला आहे.