ग्लोबल न्यूज नेटवर्क। भारत देश हा कृषिप्रधान असल्यामुळे शेती व्यवसायावरच बहुतांश लोकसंख्या अवलंबून आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे लाखांचा पोशिंदा बळीराजाची अवस्था वाईटाहून वाईट झाली आहे. या वर्षीच्या कुठे ओला दुष्काळ, कुठे महापूर, तर कुठे कोरडा दुष्काळ असल्याने बळीराजाचे पुरते कंबरडेच मोडल्याचे दिसून येत आहे.
वर्षातून एकदा येणाऱ्या बैलपोळ्याला दरवर्षीप्रमाणे दिसणारा उत्साह या वर्षी नाही. परंतु यंदा निसर्गाने पाठी फिरवल्याने मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. उभी पिके करपत असलेली पाहण्यावाचून बळीराजासमोर गत्यंतर नाहीये. तर बार्शी तालुक्यातील कित्येक गावात तर खरिपाची पेरणी देखील झालेली नाही.आणि पावसाळा संपत आला तरी अद्याप पाऊस पडलेला आहे. एकही ओढा, नदी, नाला पाण्याने भरून आला नाही.
काही ठिकाणी दुबार, तर काही ठिकाणी तिबार पेरणी करूनही पोळा सणाला मूग, उडदासारख्या पिकावर बळीराजाची मदार असते, परंतु यंदा असे पीक हातचे गेल्याने जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे. आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजवण्याची, नवे साहित्य विकत घेण्याची बळीराजाची खूप इच्छा असते, परंतु बाजारातील वस्तूंचे दर पाहिल्यावर मात्र हताश होण्यापलीकडे बळीराजासमोर पर्याय नाहीये.
हाती कोणतेही पीक नाही, समोर कर्जाचा डोंगर अशा भीषण परिस्थितीत मराठवाडा व राज्यातील बळीराजावर पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.