मुंबई : राजधानी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर गुरुवारी (ता. 25) शिवसेनेत प्रवश करणार आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादीला दिलेला हा सर्वात मोठा दणका असून, राजधानीत राष्ट्रवादीचे निवडणुकांच्या अगोदरच पानिपत झाल्याची चर्चा सुरू आहे.
बुधवारी सचिन अहिर यांनी या स्वत:च्या वरळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी राष्ट्रवादीला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनीही स्थानिक पदाधिकाऱयांशी चर्चा करून अहीर प्रवेश करत असल्याचे अवगत केले.
अहिर हे मुंबईतील राष्ट्रवादीचा चेहरा असून राज्य मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री राहिलेले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येेष्ठ नेते जयंत पाटील यांचे अहिर यांना राेखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आदित्य ठाकरेंचा विजय?
सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असल्याचं बोललं जात आहे. कारण, आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील काही मतदारसंघांची चाचपणी सुद्धा केली होती आणि त्यामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघाचाही समावेश होता. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढली तर त्यांचा विजय निश्चित होईल असं बोललं जात आहे. वरळी विधानसभेचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे शिवसेनेचे आहेत आणि सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्याचाही फायदा शिवसेनेला होईल.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी व Filmy Marathi चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा