राणे यांनी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं
सिंधुदुर्ग । भाजपमध्ये गेल्याने भाजपचही पारडं जड होणार असल्याचं माजी मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचं सिंधुदुर्गात स्वागत करण्यात आलं. त्यांनी मला महाजनादेश यात्रेचं निमंत्रण दिलं असतं तर महाजनादेश यात्रेत सहभागी झालो असतो. पण निमंत्रण न दिल्याने व्यासपीठावर गेलो नाही, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली. या यात्रेचं नारायण राणे यांनी स्वागत केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यात येणार असल्याचं सांगतानाच नितेश राणेसह महाराष्ट्र स्वाभिमानचे कार्यकर्ते भाजपच्या तिकीटावरच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं. याबरोबरच आपण निवडणूक लढणार नसल्याचेही त्यानी सांगितले.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.