जितेंद्र आव्हाड आक्रमक ; व्हिडिओ वायरल

ग्लोबल न्युज नेटवर्क: राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेल मध्ये रूपांतर करण्याचा राज्य सरकार चा निर्णय हा संताप जनक असून महाराष्ट्रातील गड किल्ले हे कोणाच्या बापाची जहागिरी नाही आम्ही हे कदापिही होऊ देणार नाही अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

याबाबत आव्हाड म्हणाले कि आमच्या पूर्वजांच्या रक्तातून लिहला गेलेला इतिहास या किल्ल्याना आहे .इथला प्रत्येक दगड हा इतिहासाचा साक्षीदार आहे . इथली माती आम्ही डोक्याला लावतो ती इतिहासाची साक्ष देऊन जाते, नव्हे तर हि माती ऊर्जा स्त्रोत आहे. छत्रपती शिवराय,संभाजी महाराज व राजमाता जिजाऊं चे विचार आहेत.

त्या मातीवर हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही वेगवेगळ्या गडांवर गेल्यावर मासाहेब व शिवाजी राजेंचे संभाषण आठवते जीवा काशीद ,तानाजी मालुसरे आठवतात.हे किल्ले आमचा स्वाभिमान व अस्मिता आहे पक्ष,कार्यकर्ते महसूल ह्याचे आम्हाला देणे घेणे नाही आम्ही इतिहासाची खेळू देणार नाही.

ज्या इतिहासाचे धडे दाखले आपण आजही देतो ज्या इतिहासाने महाराष्ट्र जगात पोहचवला त्या इतिहासाचा आम्ही खेळ होऊ देणार नाही किल्ले हे पर्यटनासाठी नाहित तर ते इतिहास जाणून घेण्यासाठी आहेत.या किल्ल्यांचा पार्ट्यांसाठी ,नाचण्यासाठी वापर करणारे , हे सरकार आहे कि काय असा सवाल करत इतिहासाबद्दल , शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही त्यांच्या इतिहासाबद्दल,बलिदानाबद्दल आदर नाही अश्यांच्या हातातील हे सरकार आहे.

मराठी मातीबद्दल शिवरायांबद्दल आदर आहे असा प्रत्येक मराठी माणूस या निर्णयाला विरोध करेल मराठी माणूस कोणाच्या बापाचा मींदा नाही असेही आव्हाड या वेळी म्हणाले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

admin: