संध्याकाळी 6 वाजता दरवाजे क्रमांक 27,10,18,19 मधून 2000 क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय
औरंगाबाद । जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे, यामुळे जायकवाडी धरणाचे दरवाजे आज उघडण्यात येणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता दरवाजे क्र. 27,10,18,19 मधून 2000 क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोदावरी नदीत हजारो क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याने गोदावरी नदीला तुफान पूर येण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्याने दुष्काळी मराठवाड्याला संजीवनी मिळणार आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना होणार फायदा या पाण्याचा फायदा होणार आहे.
जायकवाडी धरणात 99.98 टक्के जलसाठा जमा झाला आहे. आज रविवारी सायंकाळी धरणाचे चार दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून या चारही दरवाज्यातून 2 हजार क्यूसेक यावेगाने गोदावरी नदी पात्रात विसर्ग केला जात आहे. दरम्यान धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातुन 1 हजार 600 तर डावा उजवा कालव्यातुन 1 हजार 60 आणि चार दरवाज्यातून २ हजार क्यूसेक असा एकुण 5 हजार 20 क्यूसेक याप्रमाणे धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे.
यावर्षी दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेवर भरले असल्याने धरणाचे दरवाजे उघडणार आहे. हे बघण्यासाठी पर्यटकांनी धरण परीसरात मोठी गर्दी केली होती. सध्या जायकवाडी धरणात वरच्या धरणातुन येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. जेवढे पाणी धरणात दाखल होत आहे. तेवढेच पाणी गोदावरी पात्रात सोडले जाणार असुन धरणाची पाणी पातळी 98 टक्याच्या खाली येऊ देणार असे पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात आले आहे. जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडल्याने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी नांदेड या पाच जिल्ह्यातील शेती सिचंनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.