भाजपाला आणखी एक धक्का, आधी पाठिंबा दिलेल्या 3 आमदारांनी सोडली साथ

मुंबई । बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीला देऊ केला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. कारण सुरुवातीला राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात बाविआचे तीनही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपचं सरकार कोसळताच त्यांनी आपला पाठिंबा हा महाविकास आघाडीला देऊ केला आहे. यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ आणखी वाढले आहे.

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षीतिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती स्वत: अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. बविआने दिलेल्या या पाठिंब्यामुळे भाजपची ताकद मात्र कमी झाली आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: