पंरडा । सागंली आणि कोल्हापूरला आलेल्या महापुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी असलेली महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. पुरामुळे भाजपच्या या महाजनादेश यात्रेच्या वेळात बदल झाला असून यात्रा 5 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार यात्रेचा दुसरा टप्पा 21 ते 31 ऑगस्ट, असा 11 दिवसांचा आसणार असून तो नंदुरबार येथून सुरु होत असल्याची माहिती यात्रा प्रमुख तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर यांनी दिली.
राज्यातील विधानसभेची निवडणुक तोंडावर येऊन ठेपली आहे. पुढच्या महिण्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध राजकीय घडमोडींनाही वेग आला आहे. भाजपच्या निवडणूक पुर्वतयारीचा एक भाग आसलेल्या महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे, 55 मतदार संघात पोहचणार आहे. 39 जाहीर सभा तर 50 स्वागत सभा होणार आहेत.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा,ग्लोबल मीडिया सोल्युशन्स