मुंबई । आगामी विधानसभा निवडणूकीसाठी महाआघाडीने आपला ‘शपथनामा’ प्रसिध्द केला आहे. या जाहीरनाम्यात शेतकरी, युवक आणि महीलांच्या प्रश्नांना महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.
मुंबईत आयोजित एका पत्रकारपरिषदेद्वारे हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची व मित्र पक्षांच्या नेत्यांची देखील उपस्थिती होती.
काय आहे जाहीरनाम्यात…
- नव्या उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा आणणार
शेती-
- शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणार
- शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्व लक्षात घेता शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
शिक्षण
- विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रश्न सोडविणे, परीक्षा निकाल वेलपत्रकप्रमाणे पार पडण्याच्या दृष्टीने विद्यार्थी हक्क आयोग स्थापणार
- तरुण सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता
- उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्द करून देणार
- कामगारांचे किमान वेतन 21 हजार करणार
- UPSC प्रमाणेच MPSC चे वेळापत्रक निश्चित करणार तसेच या परीक्षेचा निकाल 45 दिवसांत जाहीर करणार
- अर्धनागरी आणि ग्रामीण भागातील पदवीधर बेरोजगारांना किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणार…
- राज्य सरकारच्या विविध खात्यात रिक्त असलेल्या जागा 100 दिवसांत भरण्याची प्रक्रिया सुरू करणार..
- मनरेगा अंतर्गत किमान 200 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणार
- प्रत्येक जिल्ह्यात एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करणार
- राज्यातील प्रत्येक नागरिक आरोग्य विम्याच्या कक्षेत आणणार
- सर्व महानगरपालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंत असलेल्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करणार
- नव्या मोटार वाहन कायद्यात आकारण्यात येणार दंड कमी करणार
- महाराष्ट्रातील दहावी पास दहा लाख तरुणींना पहिल्या वर्षात मोफत लॅपटॉप देण्यात येणार
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi