फडणवीसांची राज्य सरकावर पहिली टीका, म्हणाले- CMP मध्ये …

मुंबई  । राज्यात नुकतेच महाआघाडीचे सरकार स्थापन झाले असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची तर अन्य सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिवाजी पार्क मैदानावर हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

या सोहळ्याला विविध क्षेत्रातील नामवंत हस्ती उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र हा कार्यक्रम उरकताच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून सक्रीय झाले असून त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या सरकारवर टीका केली आहे.

आघाडी सरकारने जाहिर केलेल्या किमान समान कार्यक्रमात अनेक घोषणांचा पाऊस असून विकासापासून वंचित राहिलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा साधा उल्लेख देखील नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: