राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांची संख्या लक्षात घेवुन 26 लाख घरे बांधणार :राजेंद्र मिरगणे
मुंबई: पोलीस कर्मचारी, होमगार्ड, माजी सैनिक, बांधकाम कामगार, विविध खात्यातील शासकीय कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र व समर्पित गृहप्रकल्प उभारणाचा महत्वपुर्ण निर्णय महाहौसिंगने नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी दिली.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कक्षात इलेक्ट्रॉनिक मिडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्याने निश्चीत केलेले 26 लाख घरकुले निर्मितीचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी गृहप्रकल्पाच्या निर्मितीला प्रभावीपणे गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांची संख्या लक्षात घेवुन 26 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी इतर शासकीय गृहनिर्माण मंडळांना पुरक संस्था म्हणून महाहौसिगचे काम महत्वाचे ठरणार आहे.महाहौसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बेघरांसाठी गृहप्रकल्प उभारणीबाबत महत्वकांक्षी निर्णय घेतले.
पुणे येथे 10 हजार व भुसावळ येथे 5 हजार घरांच्या वसाहतीला तत्कालीन स्थानीक गरज लक्षात घेवुन तातडीने मंजूरी दिली. आता ऑगस्ट 2019 मध्ये 11200 घरांच्या प्रकल्पांना मंजूरी मिळणार आहे. पोलीस कर्मचारी, होमगार्ड, माजी सैनिक, बांधकाम कामगार, विविध खात्यातील शासकीय कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र व समर्पित गृहप्रकल्प उभारणाचा महत्वपुर्ण निर्णय महाहौसिंगने नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार घेतला आहे.