शिवसेनेने अस्थिर सरकार केवळ स्थिर नव्हे तर मजबूत केले-उद्धव ठाकरे
बार्शी; युती सरकारने अनेक चांगली कामे केली आहेत. शिवसेना युतीत आहे, होतो व राहणार. सत्तेत असताना जे पडले नाही त्याच्या विरोधात बोललो. सरकार चुकलं असेल तर त्यांचे कान उपडण्याचे काम मी केले. चांगल्या कामाला कधी विरोध केला नाही, पाय घातला नाही.
भाजपाचे सरकार हे अस्थिर होते. हिंदुत्व, जनता व राज्याच्या हितासाठी हे सरकार मी स्थिर नाही तर मजबुत केले. आमच्यात कधीच भांडणे नव्हती. लोकसभेला आम्हाला भरभरुन दिले. राज्याने आमच्या युतीला स्वीकारले याचा अभिमान वाटतो. जनता आशीर्वाद देत असताना आम्ही करंटे पणाने का वागू हे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
सर्व जाती-धर्माची माणसे आमच्या सोबत आहेत. ते केवळ सरकार आल्यावर समाजाला न्याय मागायला आली आहेत. प्रेम आणि विचाराने आम्ही माणसे जिंकत आली आहोत. ही सभा करमणुकीची नव्हे तर तुम्हा काही देण्याची आहे. शिवसेना जे बोलते तेच करते, असे सांगत आमच्या वचननाम्यात दिलेली सर्व आश्वासने शिवसेना नक्की पूर्ण करणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवारांच्या टिकेला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, जनतेसाठी आमची स्वयंपाक करावयाचीही तयारी आहे. पण पाणी अजितदादांच्या त्या धरणातील नको, अशी टीका केली.
शरद पवारांबद्दल आदर आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. आम्ही पवारांसारखे आपल्याच पक्षातील नेत्याच्या पाठीत वार करुन मुख्यमंत्री होणारे नाहीत. पवार म्हणजे स्वतः चांगले करावयचे नाही आणि दुसर्या करुन द्यायचे नाही. त्यांनी काड्या केल्याने आमचे सरकार पडत नाही, अशी टीका करत जनतेला शब्द देताना विचार कर पण दिलेला शब्द खाली पडू देवू नको, अशी आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, असे ठाकरे म्हणाले.
तानाजीराव सावंत यांनी राऊत यांच्यावर टीका करताना भावाप्रमाणे प्रेम केले. मात्र त्यांनी आम्हाला धोका दिला. 6 महिन्यांत आर्यन कारखान्याची ऊस बिले देवू, असे आश्वासन देवून, नगरपालिकेची सत्ताही माझ्यामुळे आली, असे सांगत दिलीप सोपल यांच्यासारख्या सुसंस्कृत व सुशिक्षित माणसाला संधी द्या, असे आवाहन सावंत यांनी केले.
दिलीप सोपल यांनी विरोधकांवर टीका करताना किती वेळा पक्ष बदलला याचा विचार करावा. सत्तेतल्या पक्षात जाण्याची त्यांची सवय आहे. त्यांचा नगरपालिकेतील कारभार पहा. पाणी नाही, रस्ते खराब आहेत. गाव उकरुन ठेवलयं नव्हे तर मोहेजोंदडो झालायं. जनता माझी भगवंत असून ती दुष्काळाने होरपळत आहे. आमच्या परिसरातील धरणे पाण्याने भरुन द्यावीत एवढीच आमची मागणी असल्याचे सोपल म्हणाले.