राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल – धनंजय मुंडे
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते भाजपत प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र उदयनराजेंनी भाजपसमोर काही अटी ठेवल्याने त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर गेला होता.
मात्र कालच्या (गुरुवार) घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. उदयनराजे यांनी पक्ष का सोडला हेच कळत नाही. पण राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल. पवारसाहेबांनी इतका जीव लावूनही ते पक्ष सोडत असतील तर प्रवेश दुर्दैवी आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
उदयनराजे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रखडला असल्याची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही गुप्त बैठक घेत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीत राहणार की भाजपात जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.