नवी दिल्ली: कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाई दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (मंगळवार) पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री ८ वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपणार आहे. अशावेळी संपूर्ण देशाचं लक्ष पंतप्रधान मोदींच्या संबोधनाकडे लागून राहिलं आहे. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन पुढे देखील वाढविण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.