नांदेड- पनवेल रेल्वेला आजपासून बार्शीत थांबा थांबा बार्शी : नांदेड ते पनवेल बार्शी मार्गे दररोज पुणे व मुंबईला जाणेसाठी रेल्वे आहे, परंतु या गाडीला बार्शी येथे थांबा नव्हता.मात्र या1गाडीला रेल्वेने थांबा मंजूर केला आहे.
बार्शीहून मुंबईला जाणेसाठी दररोज रात्री लातूर ते मुंबई ही एकच गाडी आहे. परंतु बार्शीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.त्यामुळे अनेकांची अडचण होती, याचाच विचार करून माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल, रेल्वे बोर्डचे विभागीय अध्यक्ष खासदार रणजीत नाईक निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, रेल्वेचे डीआरएम व जनरल मॅनेजर यांचेकडे पत्र देऊन पाठपुरावा केला होता.
याची दखल घेऊन चौदा सप्टेंबर पासून या रेल्वे ला बार्शी येथे थांबा मंजूर झाला आहे.यामुळे प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी यांची सोय होणार आहे.रेल्वे च्या या निर्णयामुळे गरिकांतून आनंद व्यक्त होत आहे. बार्शी शहरातून पुणे व मुंबईला जाणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे, परंतु मुंबई ला जाण्यासाठी दररोज एकच रेल्वे होती, त्यामुळे व्यापाऱ्यांची अनेकवेळा अडचण होत होती, परंतु या रेल्वेमुळे व्यापारी व सर्वच नागरिकांची सोय झाली असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोंढा म्हणाले.