खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन:गुरुराज माशाळ
🛎श्रीहरिकोटा : भारताच्या चंद्र मोहिमेतील मैलाचा दगड असलेल्या चांद्रयान २ ने पृथ्वीची नयनरम्य फोटोज पहिल्यांदाच पाठवले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) फोटोज देशवासियांसाठी शेअर केले आहे.
🛎जम्मू : काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॕशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांच्या घरी रविवारी एक सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती, शाह फैसल, सज्जाद लोन तसेच काँग्रेस नेत्यांचा देखील सहभाग होता.
🛎 जम्मू काश्मीरः भ्रष्टाचाराच्या आरोपावरून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना लाचलूचपत विभागाने नोटीस पाठवली आहे.
🛎नवी दिल्ली: जम्मू काश्मीर मधील अंतर्गत सुरक्षे विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षेच्या मुद्यावरून काल बैठक बोलावली होती या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृह सचिव राजीव गौबा, जम्मूकाश्मीर विभागाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश कुमार प्रमुख उपस्थित होते.
🛎 उत्तर प्रदेशः सोनभद्र हत्याकांडप्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कारवाई.
🛎 मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांची नाव सूचवली आहे.
🛎मुंबई : रविवारी मुंबईतील मरीन ड्राइव्हवर समुद्रातून बाहेर फेकले गेलेल्या हजारो टन कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने ५५ कर्मचारी, तीन डंम्पर, दोन मोठे तर तीन छोटे कॉम्पॅक्टर क्रेनचा वापर करून कचरा साफ केला. काही मुंबईकरांनी ट्विटवरुन या गोष्टीबद्दल संताप व्यक्त केला असून समुद्राने आपला कचरा आपल्याला परत दिल्याचे मत व्यक्त केले आहे.
🛎मुंबई : हवामान विभागाने आगामी ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने आज दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी पालघर, ठाणे, रायगड,मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी असा निर्णय शासनाने घेतला आहे.
🛎मुंबई : मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे, जोरदार होत असलेल्या अतिवृष्टीमुळे लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
🛎नाशिक : शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाने कहर केला असून गोदावरी नदीलाही पूर आला आहे. संततधार पावसामुळे नाशिकमधील जनजीवन विस्कळीत झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
🛎रायगड : रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा आंबेत पूल कोसळल्याची अफवा समाज माध्यमातून पसरवण्यात आले आहे, पूल कोसळला ही अफवा असून सद्यस्थितीत हा पूल कमकुवत आहे, अशी माहिती माणगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता पी.एस. राऊत यांनी दिली.
🛎पुणेः पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवावा लागण्याची शक्यता; नागरिकांनी सावधानता बाळगावी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन.
🛎आळंदी : गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी गाठली असून रुद्र रूप धारण केले आहे. यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
🛎 सांगली : सांगलीत कृष्णा नदीतील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. आयर्विन पुलाजवळ 40.8 फुटांवर पाणी पातळी पोहोचली आहे,त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
🛎मोहोळ : सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील हिवरे गावच्या शिवारात भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात होऊन एकजण जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी आठ वाजता घडला. अमोल सज्जन बारबोले वय २८ वर्षे. रा हिवरे असे मृत तरुणाचे नाव आहे.
🛎सोलापूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी जिल्ह्यात 398 टँकर सुरूच आहेत. पुणे, सातारा, सांगली, मुंबई, कोल्हापूर आदी जिल्ह्यात पुराची स्थिती निर्माण झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र दुष्काळी परिस्थिती कायम असून टँकरव्दारेच जिल्ह्यातील काही गावांचा तहान भागविली जात आहे.
🛎सोलापूर : पुणे जिल्ह्यातील 19 पैकी 13 धरणांतून 1 लाख 15 हजार क्युसेक तर नीरा नदीवरील वीर धरणांतून 67 हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने ‘भीमा’काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
🛎सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी बाळासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील नेत्यांनी मिळून तिसरी आघाडी तयार केली आहे. या तिसऱ्या आघाडीतील नेत्यांची काल सोलापूरात पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बाळासाहेब शेळके, माजी महापौर अलका राठोड, बसवराज बगले, रासपचे उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, हरिष पाटील, युवराज राठोड, मुजीब शेख यांच्या सह अन्यमान्यवर उपस्थित होते.
🛎 सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर मतदार संघाची उमेदवारी मिळाल्यास त्यांना आपला विरोध कायम राहील अशी घोषणा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी काल सोलापुरातील पत्रकार परिषदेत केली आहे.
🛎सोलापूर : महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावरील थेलियम विष प्रयोग प्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरुद्ध कलम 307, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व 327 जीवितास धोका निर्माण करणे अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत केडगे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.