परळी | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा परळी वैजनाथमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी पार पडली. नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी परळीमध्ये वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सभेला सुरुवात केली.
या सभेदरम्यान त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनीकाँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करत थकलेले लोक तुमचे काय भले करु शकतात असा सवाल विचारला. तसेच बीडच्या भूमीने मला गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन असे दोन मित्र दिले. मात्र हे दोघेही आज हयात नाहीत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम युतीच्या सरकारला करायचे असल्याचे ते म्हणाले.
मोदींनी भाषणावेळी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, त्यांच्या पक्षातील सर्व तरुण चेहरे हे पक्ष सोडत आहेत. आता त्यांच्याकडे फक्त थकलेले चेहरे आहेत. आता ते नेतेही हताश निराश झाल्याचे सांगतही फिरत आहेत. थकलेले हारलेले लोक तुमचे भले करु शकतात का? मग अशा लोकांची गरजचं काय असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
बीड जो विचार करत आहेत तोच विचार संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. तुम्ही प्रत्येक वेळी येथे कमळ फुलवले आहे. यावेळीही तुम्ही पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडणार असे मला जनसागर पाहून वाटतेय. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
बीडचा विश्वास कायम भाजपवरच असल्याचे मोदी म्हणाले. बीडच्या भूमीने मला गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन असे दोन मित्र दिले. मात्र हे दोघेही आज हयात नाहीत. त्यांच्या स्वप्ननांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कायम कमळाला साथ दिली.
यावेळी सर्व रेकॉर्ड तुटतील, असे मला वाटते, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. तसेच यंदा सर्वात जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पुरुषांपेक्षा महिलांनी सर्वात जास्त मतदान करावे असे अवाहनही मोदींनी केले आहे.
कलम 370 च्या मुद्द्यावर मोदींनी भाष्य केले. या विरोधकांनी अनेक वक्तव्य दिली. इतिहासात जेव्हा जेव्हा कलम 370 ची चर्चा व्हायची तेव्हा देशहिताचा निर्णयात विरोध करणाऱ्या लोकांच्याचा उल्लेख इतिहासात अवश्य होईल. ते काय बोलले होते याविषयी मी तुम्हाला आठवण करुन देतो.
एक म्हणाले होते की, हा निर्णय एखाद्याची हत्या करण्याप्रमाणे आहे. तर एक नेता म्हणाला होता की, हा भारतीय राजकारणाचा काळा दिवस आहे. एक नेता म्हणाला की, केंद्राने जो निर्णय घेतला तो लोकशाहीच्या विरुद्ध आहे. तर एक नेता म्हणाला की, भारतात लोकशाही संपली आहे. तर एक म्हणाला की, या निर्णयाने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. मात्र ही आपल्या विरोधकांची भाषा आहे. असे म्हणत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्रात जल योजनेसाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च केले जातील. पाण्यासाठी एवढा गंभीर प्रयत्न भारत तर काय जगाच्या इतिहासात झालेला नाही. मला आनंद आहे की, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने 2022 पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचा संकल्प घेतला आहे. जलयुक्त शिवारच्या कार्यक्रमात सरकारसोबतच तुम्हा सर्वांची मोठी भूमिका आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजपकडे लक्षावधी कार्यकर्त्यांची फौज आहे आणि ते हृदयद जिंकतात. भाजपकडे समाजाप्रती समर्पित लोकांची फौज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्यकर्ते भाजपचे समर्थन करतात. एकीकडे भाजप शिवसेना युतीची कार्यशक्ती आहे. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची स्वार्थशक्ती आहे. या दोन्हीची स्पर्धा आहे. लोक कार्यशक्तीला पाठिंबा देतात. असे म्हणत मोदींनी विरोधकांना धारेवर धरले.