बार्शी: : आपण शेती ,उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करीत आलो आहोत़ जगाच्या तुलनेत आपल्या देशात भूगर्भातून सर्वाधिक पाणीउपसा केला जातो़ मात्र त्या बदल्यात परत जमीनीत पाणी मुरवण्याबाबत आपण जागृत नाही़ आपल्या डोक्यावर म्हणजे घराच्या छतावर पडलेल्या पाण्याचा आपण विचार करीत नाही़ मात्र याबाबत गांभींर्याने विचार करुन ते पाणी रेन वॉटर हार्वेस्टींगच्या प्रयोगाद्वारे अडवून जमीनीत सोडल्यास पाणीटंचाई जाणवणार नाही असा विचार वॉटरमॅन निवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी मांडला.
अत्यंत कमी खर्चात आणि अतिशय सोप्या पध्दतीने आपल्या घरावर, कार्यालयावर, इमारतीवर पडणा-यापावसाचे पाणी जमिनीत कसे मुरवावे याचे शास्त्रशुध्द मार्गदर्शन दळवी यांनी केले़ येथील मातृभूमी प्रतिष्ठान, लायन्स क्लब बार्शी,टाऊन, रोटरी क्लब, क्रेडाई बार्शी, लायनेस क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रेन वॉटर हार्वेस्टींग या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले हे उपस्थित होते़ अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष असिफ तांबोळी हे होते़ कार्यक्रमास अभिनेते उदय सबनीस, निर्माते दीपक नलावडे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड़ मिनल साठे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रविंद्र माने, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, लायन्स क्लबचे अध्यक्ष अमित इंगोले, मातृभूमीचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रोहित कटारिया, क्रेडाईचे अध्यक्ष चेतन जैन,लायनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ़ गौरी गायकवाड, लायन्स क्बचे अध्यक्ष राहुल साखरे आदी उपस्थित होते.
जागतिक तापमान वाढत चालले आहे़ औद्योगिक क्रांतीसाठी आपण उर्जेच्या मागे लागलो, त्यासाठी भूगर्भातील कोळसा व शेतीसाठी पाणी वापरु लागलो़ सध्या सर्वत्रच झाडांची संख्या कमी झालेली आहे़ त्यामुळे पाऊस कमी पडत आहे़ पाण्याचा देखील अमर्याद वापर करीत आहोत मात्र ते जमीनीत मुरावे यासाठी आपण प्रयत्न करीत नाही़
आपल्याला पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जल पुर्नभरण करणे गरजेचे आहे़ प्रत्येकाने आपल्या गावात व शिवारातच नव्हे तर घरावर पडलेला पाण्याचा थेंब ना थेंब अडवला पाहिजे,आपल्याकडे अडीच टक्के जमीन व चार टक्के पाणी आहे़ आपण एक टक्याचा वापर करतो़ आपल्याकडे ५० हजार लिटर पाणी एक हजार चौरस फुटावर पडते मात्र आपण त्याचा वापर करतो का सवा सवाल केला़ आपण सर्वाचे पैसे मोजतो मात्र सर्व स्त्रोतातून घेत असलेल्या पाण्यासाठी काय करतो़ आपण भूगर्भातील २५ टक्के पाणी उपसतो ते जगात हे प्रमाण केवळ १८ टकके आहे याचा ही विचार केला पाहिजे़ रेन वॉटर हार्वेस्टिींगला जास्त खर्च येत नाही ही योजना सर्वांनी राबवावी असे आवाहन ही दळवी यांनी केले़ प्रास्ताविक अमित इंगोले यांनी केले़ तर आभार डॉ़ अमोल सुराणा यांनी मानले़ सुत्रसंचलन अर्चना आवटे यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व पालिकेत रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवू
संसारात सुख दिसते व ते असत नाही़पाण्याबाबत सर्वजण बोलतो मात्र त्याबाबत उपाययोजना करत नाही़ कांही ठरावीक लोकांनी जर रेन वॉटर हार्वेस्टंींग कार्यक्रम राबविला तर त्याचा निश्चीतच फायदा होईल़ बार्शीकरांमुळे पाणी मुरवण्याची मोहिम जिल्ह्यात जाईल़ जिल्ह्यातील सर्व पालिकांनी आपल्या स्तरावर जलशक्ती अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टींग कार्यक्रम राबवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी केले़ तसेच वृक्ष लागवड अभियान अंतर्गत झाडांची ही मोठ्या प्रमाणात लागवड करावी़ आजोबा ते नातूू-पणतू असे उदाहरण देत पुर्वी नदीवर पाणी पित होतो आता विहीर, नळ व आता बाटली आहे़ त्यामुळे याचा विचार करुन पाण्याचा गैरवापर थांबवून जास्तीत जास्त पाणी मुरवण्यासाठी प्रयत्न करावेत असे ही भोसले म्हणाले.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा