ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांचे निधन: जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास

प्रसिद्ध साहित्यक विचारवंत चरित्र अभिनेते
नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, पद्मश्री पद्मविभूषण मराठी व कन्नड साहित्य क्षेत्रातील नामवंत.. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त..आदरणीय गिरिष कर्नाड याचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं.

गिरिष कर्नाड यांनी 1992/1993 साली तलेदंड नावाच नाटक लिहल होत..त्यावेळी देशात रामजन्मभूमी व बाबरीमशिदीचा वाद फोफावला होता..हे नाटक महात्मा बसवेश्वर व बिज्जलाच्या जीवनावर आधारित होत..ब्राह्मणाची मुलगी व चाम्भाराचा मुलगा यांच्या 12 व्या शतकातील प्रेमविवाह व या प्रेमविवाहास वीरशैव लिंगायतानी दिलेला पाठिंबा..त्यातून निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती..असा तो विषय होता..तलेदंड नाटकातील राजा बिज्जलाच्या पत्नीच नाव कर्नाटकातील एकाही शिलालेखात सापडले नव्हते..त्याच्या पत्नीच नाव सोलापूर जिल्ह्यातील नान्नज या ठिकाण च्या एका शिलालेखात थोर पुरातत्व संशोधक आनंद कुंभार यांना मिळाला..आणि गिरिष कर्नाड यांना याचा खुप आनंद झाला..

गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले होते….कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते…. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले…
गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते….
नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत.
गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे….
गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेले व गाजलेले अनेक चित्रपट आहेत त्यामध्ये
उत्सव (हिंदी भाषेत) उंबरठा (मराठी) ओंदनोंदू कालादल्ली (कानडी) कनक पुरंदर (कानडी)
काडू (कानडी) कानुरू हेग्गदिती (कानडी) गोधुलि (हिंदी) तब्बलियू नीनादे मगने (कानडी) निशांत (मराठी)
वंशवृक्ष (कानडी) हि प्रमुख आहेत..तसेचकर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली नाटके खुप गाजली…खरतर
कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.अग्नी मत्तू मळे (कानडी भाषेत) टिपू सुलतान (मराठी भाषेत)तलेदंड (कानडी) तुघलक (मराठी)
नागमंडल (मराठी) ययाती (मराठी) हयवदन (मराठी)
गिरीश कर्नाड यांना अनेक सन्मान व पुरस्कार लाभले..त्यामध्ये .कालिदास सन्मान पुरस्कारतन्वीर सन्मान पुरस्कार (२०१२)नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२) पद्मभूषण (१९९२)पद्मश्री (१९७४)
भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्याना राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला..
सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल (१९८९)
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद (१९७४-७५) ’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२) संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०) संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार (१९७२) साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४)
होमी भाभा फेलोशिप (१९७०-७२) ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)
गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कान्नड भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर ’राजहंस प्रकाशना’ने छापून प्रसिद्ध केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वतःच्या लग्नापाशी थांबते…..

admin: