मुंबई | राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दर तासाला बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात 145 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 635 वर पोहचला आहे.
या 635 रुग्णांपैकी एकट्या मुंबईत 377 रुग्ण आढळले आहेत. तसेच आज दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. आजच्या 6 मृतांमध्ये मुंबईतले 4 रुग्ण असून मुंब्रा आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी 1 – 1 रुग्णांचा समावेश आहे.ही आकडेवारी शनिवारी सायंकाळ पर्यंत ची आहे.
तर आतापर्यंत या आजारातून 52 रुग्ण बरे झाले असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा कहर बघता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील नागरिकांसोबत संवाद साधत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.