गेल्या पाच वर्षात भाजपने लातुरात काहीच केलं नाही-हर्षवर्धन पाटील

लातूर | स्व.विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला देशाच्या नकाशावर नवी ओळख निर्माण करून दिली. जिल्ह्याचा कायापालट करून विकास केला. मात्र 2014 च्या निवडणुकीत खोट्या अश्वासनाना भुलत भाजपला निवडून दिले, त्यांनी गेल्या 5 वर्षात जिल्ह्यात काहीच केलं नाही.आता पुन्हा आपल्याला संधी आली आहे. मच्छिन्द्र कामंत यांना निवडून देऊन थांबलेला विकास पुन्हा सुरू करूयात. असे आवाहन काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले

लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाघाडीचे उमेदवार मच्छिन्द्र कामंत यांच्या प्रचारार्थ लातूर शहरात आयोजित सभेत पाटील बोलत होते. सभेला लातूरचे आमदार अमित देशमुख, व्यंकटराव बेंद्रे,विद्याताई पाटील,चंद्रकांत देवकते, सूर्यकांत कातळे आदी उपस्थित होते.

admin: