मुंबईः कोरोना व्हायरस देशभर पसरु लागला आहे. तसंच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधिताची संख्या 52 वरून 63 वर पोहोचली आहे. राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या 63 रुग्णांपैकी 12 ते 14 जणं संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
शुक्रवारी राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 होता, तो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण पुण्यातील आहे. आपण सध्या दुसऱ्या स्टेज मध्येच आहोत. पण परिस्थिती अशीच कायम राहिल्यास चिंतेची बाब आहे. मुंबईत विदेशातून आलेले 8 रूग्ण तर संसर्गातून तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात 11 रुग्णांची वाढ झाली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
आतापर्यंत आढळलेल्या 63 रुग्णांपैकी 12 ते 14 जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. त्यापैकी 8 हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर 3 जणांना संसर्गामुळे करोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. 11 जणांपैकी 10 जण हे मुंबईचे आहेत. त्यापैकी 8 हे परदेश दौऱ्यावरून आले.
७८ लोक याविषयी बोलत आहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनाही राज्यातील परिस्थितीचा आढावा देण्यात आल्याचं ते म्हणाले. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्य सरकारच्यावतीनं मेडिकल कॉलेजमध्येही आम्ही चाचणी केंद्र उभारण्यास तयार आहोत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना याबाबत विनंती केली आहे. राज्यात लॅब्स वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात चाचणी केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ज्या लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांना आपण विलगीकरण, अलगीकरण कक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी रूग्णही ओळखणं आवश्यक आहे. यासाठी चाचणी केंद्रांची आवश्यकता आहे. तसंच यासाठी आवश्यक असणारी किट्सही वाढवण्याची मागणी आम्ही केली आहे, गरज लागल्यानंतर मागणी करण्यापेक्षा आम्ही तयारी करून ठेवत आहोत, असंही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं.
केंद्र सरकारच्या अखत्यारितील ICMRI त्यांचे नियम 100 टक्के पाळल्या, तरच आम्हाला परवानग्या द्या अशी मागणी हर्षवर्धनना सांगितली. आम्ही सर्व नियम पाळू, पण किट द्या असा आग्रह केला, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
जनतेनं खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ‘घरातील, ऑफिसमधील एसी बंद ठेवा. लोकलचा वापर टाळा. रेल्वे स्थानकांतील गर्दी कमी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे, असं टोपे यांनी सांगितलं. सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल. जर गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल बंद करावीच लागेल, असं स्पष्टपणे राजेश टोपे यांनी सांगितलं.
टेस्टिंग लॅब 3 होत्या त्या आता 7 लॅब कार्यरत आहेत. आणखी 12 ते 15 लॅब हव्या. संपर्क करुन ओळखलं पाहिजे की कोण बाधित आहे आणि त्यांना विलगीकरण करुन त्यांची तपासणी करणं आवश्यक आहे. त्यासाठीच टेस्टिंग लॅब आवश्यक असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
शरद पवारांशी चर्चा
शरद पवारांशी सविस्तर चर्चा केली, सध्याची परिस्थिती सांगितली. शरद पवारांनी तातडीने केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. शरद पवारांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी 20 मिनिटे चर्चा केली. राज्य सरकार मेडिकल कॉलेजना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. पण मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करुन द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे, असं टोपेंनी सांगितलं. टेस्टिंग फॅसिलीटी उपलब्ध करुन द्या असे सांगितले. सर्व लागणाऱ्या सुविधा द्या, सर्व खासगी रुग्णालयांना परवानगी दिली पाहिजे. आम्ही सर्व सुविधा देत आहोत.