कोरोना व्हायरसने जग धास्तावले असून आम्ही आजही त्याची भीती बाळगून आहोत.कोरोनाला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असतांनाही व काळजी घेत असतांनाही कोरोनाच्या रुग्नसंख्येत वाढ होतांना दिसत आहे.परिस्थिती विचित्र स्वरुपाची असून खरंच कोरोना मानवासाठी घातक आहे.
कोरोनाची व्याप्ती पाहता कोरोनाची लागण बहुतःश सर्व जगात झालेली असून काही देश व्यवस्थीत काळजी घेत असून त्या देशात तो विषाणू आटोक्यात आला आहे.त्यासाठी तेथील देशही मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत.भारत सध्या तरी याबाबतीत आघाडीवर आहे.
कोरोनावर उपचार सांगतांना कोणी वेगवेगळे उपाय सांगत आहेत.कोणी दारु प्यायला सांगत आहेत. कोणी गाईचं गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोना होत नाही म्हणतात.तर कोणी कापडात कापूर,लवंग याची पुळचूंडी बांधायला लावतात.तर कोणी गरम पाण्याच्या गुळण्याही टाकायला लावतात.कोणी प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी असे सांगतात.त्यासाठी आंबट पदार्थ खायला लावतात.
खरंच असे उपाय केल्यानं लोकांमध्ये फालतूचा संभ्रम निर्माण होत आहे.जो तो आपआपले वेगवेगळे उपाय करण्यात मग्न आहेत.तसंही पाहता आपला देश हा मेंढ्यांचं अनुकरण करणारा देश आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.कारण आपण स्वतः आपल्या मनाने विचार न करता बाजूचा काय करीत असतो,ते पाहात असतो.त्यानुसार वागत असतो.तसेच भीतीमुळे जो माणूस जेही खायला असेल,तेही खायला आपण बाध्य होतो
.मग ती वस्तू योग्य असो की नको.यात विचार करीत नाही.पण यात विचार केलेला बरा.यात विचार असा की ज्या वस्तू पचवायची बाजुच्या माणसाची प्रतिकारशक्ती चांगली असेल,तीच वस्तू पचवायची प्रतिकारशक्ती दुस-या माणसाची असू शकते असे नाही.समजा एखाद्या गाईच्या गोठ्यात राहणारा,गाईची अहोरात्र सेवा करणारा व्यक्ती जर गाईचं गोमुत्र पित असेल तर साहजिक आहे.कारण त्या गोमुत्रातील जंतूंना त्याच्या शरीराची सवय आहे.पण तेच गोमुत्र एका शहराच्या माणसानं जर प्राशन केलं.तर त्याला अपाय होवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण ते गोमुत्र शुुद्ध केलेलं नसतं.
अलिकडे आम्हाला रुमाल बांधलेले दिसतात.पण खरंंच रुमाल शुद्ध स्वरुपाची असते का?आपण ज्या भागातून रुमाल बांधतो.तीच बाजू परत बांंधताना वापरतो का?तसेेच त्या रुमालाने नाक,कान तरी झाकलेे असते का?ती जर दुस-या बाजूनं वापरली गेली तर त्या रुमालाचे जंतू शरीरात प्रवेश करणार नाहीत का?
महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्याला सहज शंका येत असेल,कोरोना झालाय.त्यांनी कोणीही कोणतेही उपाय सांगीतलेले पाळू नये.घरी साबनाने हातपाय धुऊन घ्यावे किंवा गरम पाण्याने हातपाय धुवून मगच घरात प्रवेश करावा.रुमाल वापरण्याऐवजी हाताने शिवलेला मास्क वापरावा.कोणीही कोणतेही उपाय न करता त्यांनी आपल्या मताने विचार करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.भोंदूबाबांकडे कोणीही जावू नये.कोणी कोणतेही उपचार सांगीतलेले ऐकू नयेे.कारण जर का असे उपाय केल्याने समस्या आलीच किंवा निर्माण झालीच तर तो कोरोना होण्यापुर्वीच निघून जाईल.मग त्याला कोणीही वाचवू शकणार नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२