जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण(Jayakwadi dam). 60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे.
जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं
नाथसागरावर अवलंबून क्षेत्र :-
जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे
जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.
औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.
धरणाचा उद्देश
सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
गोदावरी नदी
स्थान
पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस
७५५ मि.मी.
लांबी
९९९७.६७ मी.
उंची
४१.३ मी.
बांधकाम सुरू
इ.स. १९६५
उद्घाटन दिनांक
इ.स. १९७६
ओलिताखालील क्षेत्रफळ
३५००० हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता
२१७० दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ
३५० वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या
१
स्थापित उत्पादनक्षमता
१२ मेगावॉट
जायकवाडी धरण
● आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण
● जायकवाडी या धरणातील संकलित जल साठ्याला नाथ सागर म्हणतात
● हे धरण ए.ए.सिद्दीकी या मास्टर माइंड आभियंत्याने बांधलेले आहे.
● काम सुरू व समाप्त- सन.1965 – 1976
● धरणाच्या भिंतीची लांबी- 9998 मीटर्स म्हणजे 10 कि.मी.
● धरणाची ऊंची- 41.30 मिटर (135 फुट)
● धरण क्षमता- 1.027×10×10000000000 क्युसेक फिट
● जलमय क्षेत्र- 8398 स्क्वेअर मैल
● धरणाची सर्वोच्च स्ट्राँग कैपेसिटी- 2909 मिलियन क्यूबिक मिटर्स
● धरणांतील पाण्याची लांबी- 55 km.
● धरणातील पाण्याची रुंदी- 27 km.
औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्हय़ातील एकुण 237452 हेक्टर जमीन ओलिताखाली
● डावा कालवा- 208 km.
● उजवा कालवा- 132 km.
● धरणाचा शेतीसाठी उपयोग- 80%
● शहर व गावे पिण्यासाठी- 05.7%
MIDC total use of water- 0.05 मिलियन क्यूबिक मिटर
● धरणाला त्याकाळी आलेला एकुण खर्च- Rs.4750 कोटी रूपये.
● (हे धरण सुरवातीला माजलगाव व परतूर तालुक्याच्या सीमेवर गोदावरी तीरावरील जायकवाडी या दीडशे लोकसंख्या असणाऱ्या गावी होणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे धरण या जायकवाडी गावापासून नदीच्या अंतराने 111 km वर पश्चिमेला पैठण येथे झाले. व त्यावरून या धरणाचे नावं जायकवाडी पडले)