ग्लोबल न्यूज मराठी ; गेल्या वर्षभरा पासून खूपच चर्चेत असलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांगी गणात झालेल्या पोट निवडणुकीत अखेर जयवंतराव जगताप व आमदार नारायण पाटील गटाचे उमेदवार दत्तात्रय रणसिंग यांनी 765 मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी बागल गटाचे गणेश तळेकर यांचा पराभव केला.
त्यामुळे आता बाजार समितीत जगताप गटाचे बहुमत झाल्याने पुन्हा एकदा माजी आमदार जयवंतराव जगताप सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निवडणुकीत रश्मी बागल गटाला पराभवाचा सामना करावा लागल्याने एकूणच त्यांच्या चिंता वाढल्या आहेत.तर जगताप-पाटील गटात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. या निकालाने आता कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता ही बागल गटाने गमावली आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.