औरंगाबादकरांनो,आता विनाकारण घराबाहेर पडू नका!
प्रशासनाने घेतला मोठा निर्णय जलद कृती दल तैनात
औरंगाबाद :- महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.मुंबई,पुणे,नाशिक पाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1000 च्या घरात पोहोचण्याची भीती आहे.सर्व उपाय योजना करूनही कोरोनाची साखळी तोडता आला नाही. त्यामुळे आता प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे.
औरंगाबादमध्ये कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.सगळे उपाय प्रशासनाने केले मात्र,ही साखळी खंडित होऊ शकली नाही.आतापर्यंत शहरात 100 टक्के लॉकडाउनचा पर्याय प्रशासन वापरला होता. यामध्ये फक्त दवाखाने आणि औषध विक्रीच सुरू आहे.परंतु, तरीही नागरिकांचा वावर रस्त्यावर दिसतच आहे.
औरंगाबाद शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रस्त्यावर लोकांची गर्दी वाढतच चालली आहे.अखेर पोलिसांनीही औरंगाबादकरांपुढे हात टेकले आहे.आता शहराच्या बंदोबस्तात जलद कृती दल रस्त्यावर उतरवले आहे.
शहरातील ज्या भागात कोरोना पोझिटिव्ह रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत.त्या भागात आज जलद कृती दलाने संचलन केले आहे.आता घराबाहेर विनाकारण कुणी बाहेर आढळून आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 872 (दुपारी 1 वाजेपर्यंत) पर्यंत पोहचली आहे आणि सायंकाळपर्यंत हा नक्की वाढू शकतो.