मुंबई । विधिमंडळात आज बहुमत चाचणी पार पडण्याआधीच भाजपचे आमदार बाहेर गेले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग न करता नव्या आमदारांसमोर चांगला आदर्श निर्माण करायला हवा होता असा सूर राजकारणातून ऐकू येत आहे. यावरून महाविकास आघाडीने भाजप सरकारला धारेवर धरले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपला टोला लगावला. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपच्या या कृत्यावर टीका केली आहे.
आगामी काळात भाजपचे आमदार आक्रमकपणा करायला लागले तर तुम्ही काय करणार?असे विचारता पवार म्हणाले”आम्ही संसदीय पध्दतीने त्यांना उत्तर देऊ.आणि विरोधक जर राज्याच्या हिताचा मुद्दा मांडत असतील तर त्यांच्या पाठीशी राहू.” विधानसभेचा मान ठेवणआमदाराची जबाबदारी आहे. सभागृहात उगाच आवाज करायचा, गोंधळ घालायचा आणि एखादा मुद्दा लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करायचा. विरोधी पक्षाच्या अशा कृतीकडे इथून पुढे आम्ही दुर्लक्ष करु. आम्ही सर्व नवीन आमदार एकत्र राहून कामकाज सुरु ठेऊन, लोकांच्या सेवेसाठी पुढील पाच वर्ष लोकांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहू, असा शब्द रोहित पवारांनी दिला.
आज अधिवेशनाला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. हे अधिवेशन नियमाला धरून नसल्याचं सांगत कोणत्याही नवीन अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमने होते. मग या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमने का झाली नाही असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. तसंच रात्री 1 वाजता अधिवेशनाचं निमंत्रण मिळतं याबाबतही आक्षेप नोंदवला. अधिवेशन हे नियमाला धरून नसल्याचं सांगत अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांनी समन्स बोलवणं गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.