उस्मानाबाद । राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राणा जगजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे किरकोळ अपवाद वगळता भूम-परंडा व वाशी या तिन्ही तालुक्यातील संपूर्ण काँग्रेस सह शिवसेनेत प्रवेश केला आहे.या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.
त्यामुळे राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसला जबर झटका बसला आहे. राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये आणि प्रशांत चेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत (बाबा) चेडे यांनीदेखील काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि 10 ते 12 जिल्हा परिषद सदस्यांसह राजीनामे दिले आहेत.
हे सर्व हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचे दिसत आहे. शिवसेनेने काँग्रेसचा जिल्ह्याचा म्होरक्या फोडल्याने भूम-परंडा आणि वाशी तालुक्यात काँग्रेसला झळ बसणार आहे.
हे काँग्रेस नेते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश करतील. त्यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिल्याची माहिती प्रशांत चेडे यांनी दिली.
काँग्रेसच्या चेडे परिवाराचे परंडा मतदारसंघात मोठे प्रस्थ आहे. वाशी पंचायत समिती, नगर पालिका आणि बाजार समिती यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्था चेडेंच्या ताब्यात आहेत. मात्र, आता त्यावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते.
काँग्रेसचे परंडा तालुकाध्यक्ष सुभाषसिंह सिद्धीवाल, भूमचे अण्णासाहेब देशमुख आणि विजयसिंह थोरात, वाशीचे विभीषण (अण्णा) खामकर, महादेव अंधारे,
जिल्हा परिषद सदस्य जयश्री खंडागळे आणि सुनील जाधवर, वाशीचे नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि बाजार समितीचे अनेक संचालक शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.नेत्यांसह नगरसेवक,सोसायटीचे चेअरमन,सरपंच यांचा ही समावेश आहे.यावेळी उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर,माजी आ.ज्ञानेश्वर पाटिल आदि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.
काँग्रेस नेतृत्वाने केवळ निवडणुकीपुरता वापर करून कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक दिल्याचा आरोपही या नेत्यांनी केला. काँग्रेसचा एक मोठा गट शिवसेनेत जाणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता नक्कीच बदलणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महादेव अंधारे,बिभिषण खामकर,आण्णासाहेब देशमुख,सुभाषसिंह सिध्दिवाल,प्रकाश शिंदे,नितिन खंडेराव चेडे,नागनाथ प्रभु नाईकवाडी,प्रसाद जोशी,सुनिल जाधवर,छगनराव मोळवणे,विजसिंह थोरात आदि नेत्यांसह नगरसेवक,सोसायटीचे चेअरमन,सरपंच यांनी आज उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर,माजी आ.ज्ञानेश्वर पाटिल आदि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.