पंढरपूर- दौंडजवळून उजनीत मिसळणारी आवक वाढल्याने धरणातून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून तर 1600 क्युसेक पाणी वीज निर्मितीसाठी सोडले जात आहे. तर दुसरीकडे नीरा साखळी धरण परिसरात पर्जन्यराजाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने वीरमधून 54 हजार 474 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
मागील आठवड्यापासून उजनी धरणात येणार्या पाण्याची आवक वाढत चालली असून पुणे व परिसरात परतीच्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. यामुळे उजनीतून सकाळी तीस हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यातच भीमा काठी पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून नदी दुथडी भरून वाहत आहे.
आता यातच वीरमधून ही 54 हजार 474 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असल्याने नीरा व भीमा काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत नीरा धरण व्यवस्थापनाने कळविले असून सकाळी सहा वाजल्यापासून हे पाणी सोडले जात आहे. दरम्यान या पाण्याने जिल्ह्यात नीरा नदी दुथडी भरून वाहणार आहे तर भीमा ही काठोकाठ भरेल.
यामुळे नदीवरील सर्व बंधारे तसेच पंढरपूरचा दगडी पूल पाण्याखाली जाणार आहे.पुणे परिसरात कालपासून मोठा पाऊस झाला आहे यामुळे पुणे बंडगार्डन व पुढे दौंडची आवक वाढत चालल्याने विसर्ग वाढविले जात आहेत. चित्रा नक्षत्राचा हा पाऊस असून त्याने ऑक्टोंबर महिन्यात ही हजेरी लावल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi