नवी दिल्ली | मुंबईच्या आरे कॉलनीतील वृक्षतोडीला सुप्रिम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने सर्वोच्च न्यायालयात आरेतील वृक्षतोडीसंदर्भात हस्तक्षेप करण्याविषयी अर्ज दाखल केला होता.
याविषयी सुप्रिम कोर्टात आज सुनावणी झाली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने राज्य सरकारला आरेतील वृक्षतोड थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.
आरेमध्ये तब्बल साडे तीन हजार वक्ष आहेत. त्यापैकी 2238 वक्ष तोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मेट्रोच्या कारशेड प्रकल्पासाठी ही वृक्षतोड होणार होती. मात्र सुरुवातीपासून शिवसेना आणि पर्यावरण प्रेमींकडून या वृक्षतोडीला विरोध होता. हायकोर्टाच्या निर्णयानंतर प्रशासनाने रातोरात वृक्षतोड सुरू केल्याने पर्यावरणवादी संतप्त झाले.
याविरोधात त्यांनी आरेमध्ये जाऊन निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना ताब्यात घेतले होते. यावरुनही राज्य सरकारवर मोठी टीका झाली होती. त्यानंतर कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळाने सर्वोच्च न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली होती. यावर आज सुनावणी होऊन न्यायालयाने वृक्षतोडीला तुर्तास वृक्षतोडीचा आदेश दिला आहे.
यावरुन सरकारने आतापर्यंत किती वृक्ष तोडले आणि एकूणच जंगलांची परिस्थिती काय आहे याविषयी विचारणा केली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 21 अक्टोबरला होणार आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi