आम आदमीच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, जयंत पाटील म्हणतात दिल्ली अभी दूर नहीं…

मुंबई | दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे आमदार फतेह सिंह व कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या दोघांचेही स्वागत करताना दिल्ली अभी दूर नहीं… अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

पुढे जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी दिलेला एक विचार आहे आणि या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण पक्षाशी जोडले जात आहेत. हा वटवृक्ष आणखी बहरो !

विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार यांचा करीश्मा चांगलाच गाजला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून 30-35५ जागांची मजल मारेल अशी चर्चा होत असताना शरद पवार यांनी झंझावात दौरे केले. त्यांनी पक्षाचे 54 आमदार निवडून आणले. एवढेच नाही तर राज्यात महाविकासआघाडीचे सरकारही स्थापन झाले.

महाराष्ट्राच्या पाठोपाठ झारखंड राज्याच्या निवडणुका झाल्या तिथेही नवनिर्वाचित मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील या विजयाचे श्रेय खासदार पवार यांना दिले आहे. पवार यांच्याकडून प्रेरित होऊनच आपण निवडणूक लढलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. अशात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घोडदौड कोणत्या देशेने सुरू आहे हे स्पष्ट करतंय.

ग्लोबल न्युज नेटवर्क: