‘ईडीची ही कार्यप्रणाली आहे आणि ही प्रक्रिया सुरुच असते. या चौकशीतून काहीच निष्पण्ण होणार नाही, असे काल उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि आम्हालाही विश्वास आहे. ही परिक्षा असते. या परिक्षेतून सुलाखून लोक बाहेर पडतात. याकडे आपण तटस्थपणे पाहायला हवे. स्वत: उद्धव ठाकरे या सर्व घडामोडींकडे लक्ष्य देत आहेत. कालपण त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत’, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आपण राज ठाकरे यांच्या पाठिशी असल्याची म्हटले आहे, संजय राऊत यांनी ‘टीव्ही९ मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘वैयक्तिक मित्र म्हणून राज ठाकरेंबाबत ज्या उद्धव ठाकरेंच्या भावना आहेत त्याच माझ्याही आहेत. राजकारणात आम्ही सतत एकमेकांच्या विरुद्ध उभे आहोत, पण संकट काळात परिवार एक असतो, मतभेदांची जळमटं गळून पडतात हे उद्धव ठाकरे यांनी दाखवले. हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्यावर आहेत’, असे संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर ‘ईडीची ही कार्यप्रणाली आहे आणि ही प्रक्रिया सुरुच असते. या चौकशीतून काहीच निष्पण्ण होणार नाही, असे काल उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि आम्हालाही विश्वास आहे. ही परिक्षा असते. या परिक्षेतून सुलाखून लोक बाहेर पडतात. याकडे आपण तटस्थपणे पाहायला हवे. स्वत: उद्धव ठाकरे या सर्व घडामोडींकडे लक्ष्य देत आहेत. कालपण त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत’, असेही संजय राऊत म्हणाले.
‘…म्हणून उद्धव ठाकरे टोकाची प्रतिक्रिया देत नाहीत’
संजय राऊत म्हणाले की, ‘काल उद्धव साहेबांनी एक भाऊ म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकारण एका बाजूला आणि नातेसंबंध एका बाजूला असतात. राजकारणात मतभेद असू शकतात. परंतु, जेव्हा कुटुंबाचा विषय असतो तेव्हा कुटुंबप्रमुख म्हणून एक भूमिका घेणे जरुरीचे असते. हे ठाकरे कुटुंबात अनेक वेळा तुम्हाला पाहयला मिळाले असेल. मला अजूनही आठवते की राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्यावर काही प्रकरणांवरुन दोषारोप झाले होते.
तेव्हा शिवसेना प्रमुखांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हा त्यावेळेला म्हणजे मला अजूनही आठवते की मी होतो, स्वत: उद्धव ठाकरे होते, अजून काही परिवारातील लोक होते. आम्ही त्यावेळी सीबीआय कार्यालयापर्यंत त्यांच्याबरोबर गेलो होतो. ही एक रक्ताची आणि मैत्रीची नाती असतात आणि महाराष्ट्रात विशेषता मराठी माणसामध्ये ही नाती आपण जपत असतो. उद्धव ठाकरे हे भाऊ, वडील म्हणून फार संवेदनशील व्यक्तीमत्व आहेत. त्यामुळे ते कधीही कोणतीही टोकाची प्रतिक्रिया देत नाहीत.’
अंजली दमानिया यांच्या प्रतिक्रियेला राऊत यांचा टोला
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज यांच्या सोबत कुटुंबिय ईडी कार्यालयापर्यंत जात असल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. त्यांना चोख प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिला आहे.
‘सत्यनारायणाची पूजा आहे की श्रावणातील पूजा आहे, या नसत्या उठाठावी इतर कुणी करु नये. अशा प्रसंगामध्ये कुटुंबाने प्रमुख माणसाला आधार द्यायचा असतो, अशा शब्दात त्यांनी दमानिया यांना टोला लगावला. ‘अशावेळी राजकीय कार्यकर्ते असतात पण शेवटी कुटुंबाचाही पाठिंबा महत्त्वाचा असतो.
कुटुंबातला एक प्रमुख घटक म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांना आधार दिलेला आहे. जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कोर्टात जायचो तेव्हा सर्व कुटुंबिय त्यांच्यासोबत राहायचे. हि एक परंपरा आहे. कुटुंबाने सोबत जाण्यावरुन टीका करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण नाही. ज्यांना कुटुंब आहे तेच कुटुंबाविषयी बोलतात. नाती जपण्याची परंपरा आहे तेच कुटुंबाला घेऊन जात असतात. कुटुंबावरती टीका करणे हे अत्यंत हीनपणाचे लक्षण आहे’, अशा शब्दात त्यांनी दमानिया यांना प्रत्युत्तर दिले.