ग्लोबल न्युज नेटवर्क: “संचालक मंडळात अजित पवार हे एकमेव नाव नसतं तर केसही दाखल झाली नसती, पण माझ्यामुळे पवार साहेबांचं नाव आलं. हे बोलल्यानंतर अजित पवार भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, घोटाळ्याबाबत सतत आमच्याचबाबत बातम्या येतात, साहेबांमुळे मी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, पण आपल्यामुळे त्या माणसाचं नाव येतं हे पाहून व्यथित झालो, राजीनामा देऊन यातून बाहेर पडलं पाहिजे ही भावना मनात होती.
अगोदर 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, त्यातून मला वेदना झाल्या, चौकशीही संपत नाही, ती किती दिवस चालवायची ते आपल्या हातात नाही, पुन्हा 25 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप, लोकांना वाटेल अजित पवारला हजार कोटींशिवाय चालतच नाही की काय?” असेही पवार म्हणाले.
आमचे थोरले काका शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. शरद पवार हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. ते जे म्हणतात ते अंतिम असतं. मी राजकारणात आलो, सुप्रिया सुळेंच्या राजकारणातील प्रवेशाच्या वेळी, पार्थच्या वेळी आणि आता प्रदेशाध्यक्षांनी रोहितला संधी दिली तर अशीच चर्चा केली जाते हे कस असा सवाल केला.
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi