मुंबई । ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाला असुन आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करुन ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली. पंकजा मुंडे यांचे फडणवीस गटाशी वारंवार वाद झालाय त्याच आता ओबीसी समाज आरक्षणाच्य़ा मू़द्यावरुन सरकारला घेरण्याचं प्रयत्न करताना दिसतयं पंकजा सुरुवातीला फडणवीस गटाशी असलेल्या वादामुळे पक्षात सारल्या गेल्या होत्या.
हम भी इस देश के है हमारी भी गिनती करो .. ओबीसी जनगणना की आवश्यकता और अपरिहार्यता है ..कुछ यादे और कुछ वादे https://t.co/2yQi1fBgw0
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 24, 2021
त्यानंतर भाजपाकडुन पंकजा मुंडे यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. त्यामुऴे पंकजा राष्ट्रीय स्तरावरील कामांमध्ये व्यस्त झाल्या होत्या.
2021 की जनगणना जाति निहाय होना आवश्यक हैं। गाँव-गाँव से निकली आवाज़ राजधानी तक जरूर पहुँचेगी इस बात मैं कोई शक नहीं हैं।#Castewisecensus2021
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 24, 2021
मात्र, आता आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असतांना पंकजा मुंडे यांनी ट्वीट करुन पुन्हा स्थानिक राजकारणात परतण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.एकनाथ खडसे यांच्यासारखा तगडा ओबीसी नेता राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये गेला आहे.