खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
हाँगकाँग : येथेे प्रस्तावित प्रत्यार्पण कायदा संपवण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या अंब्रेला आंदोलनाला ८० दिवस पूर्ण झाले. २०१४ मध्ये याच मागणीसाठी ७९ दिवसांचे आंदोलन झाले होते. जूनपासून आतापर्यंत ८ हजारावर आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. सुमारे ५ हजार आंदोलकांनी कॅथे विमानतळ जाम केले याचा परिणाम देशभरातील १००० विमानांच्या उड्डाणांवर झाला.
नवी दिल्ली : कलम 370 हटवल्या पासडून युद्धाची भाषा बोलणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रानखान पासून गृहमंत्र्यांला गृहमंत्री अमित शहा यांनी कडक शब्दात इशारा दिला. आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत, परंतु आम्हाला छेडाल तर घरात घुसून मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला ‘एअर स्ट्राईक’ची आठवण करून दिली. गांधीनगर मधील दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विश्वविद्यालयात ते बोलत होते.
नवी दिल्ली : ‘गजनवी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करून जगाचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानला हिंदुस्थानने ठणकावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला मंत्र्यांना आवरण्यास सांगितले असून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा दिला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविष कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला ठणकावले.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील दहशतवादी कटाबाबत गुप्तचर यंत्रणेला (आयबी) महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. दिल्लीसह मुंबई आणि इतर महत्त्वाची शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. आयएसआयचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची माहिती आयबीला मिळाली आहे.
नवी दिल्ली : डायरेक्ट टॅक्स कोडवर स्थापन केलेल्या टास्क फोर्सने आर्थिक मंत्रालयाला सोपवलेल्या अहवालात करप्रणालीत फेररचना करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या पॅनलने सरकारला पाच लाखांपासून 20 लाखांपर्यंत कमाई करणाऱ्यांच्या कराच्या दरात कपात करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या खासगीकरण करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले असून ही कंपनी विकत घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट् केले आहे. त्यामुळे आता एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबई : महानगरातील परवडणाऱ्या घरांसाठी म्हणजे 60 चौ. मी. चटई क्षेत्र असणाऱ्या घरांसाठी आणि महानगर व्यतिरिक्त इतर शहरे आणि गावांमधील 90 चौ. मी. चटई क्षेत्रच्या घरांसाठी जीएसटीचा दर 8 टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आल्याने अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचे घर कमी किंमतीत मिळणे शक्य झाले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून काँग्रेसने जोरदार तयारी चालू केली असल्याचे समजत आहे. काँग्रेस 05 सप्टेंबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसने राष्ट्रावदी काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली असून विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 125-125 जागा लढणार आहे तर, मित्रपक्षांसाठी ते 38 जागा सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिन्यांपूर्वी 19 वर्षीय तरुणीचा सामूहिक बलात्कार झाला होता. या तरुणीचा काल रात्री औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या प्रकरणात अजून आरोपी मोकाट असल्याने या मृत तरुणीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : बेस्टच्या कामगारांकडून सातवा वेतन आयोग लागू करणयाच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून केले जात असलेले बेमुदत उपोषण गुरूवारी अखेर काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. मात्र गौरी-गणपतीनंतर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुजरात : गुजरातच्या कच्छ भागातून पाकिस्तानच्या कामांडोजनं भारतात घुसखोरी केल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गुजरात किनारपट्टीला छावणीचं स्वरूप आलं असून समुद्रातल्या प्रत्येक हालचालीवर नौदल बारीक लक्ष ठेवून आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरला नारायण राणे आपला पक्ष भाजपात विलीन करत भाजपाप्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 17 जुलै ते 30 जुलै दरम्यान इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आले होते. या फेरपरीक्षेचे निकाल आज दिनांक 30 आगस्ट रोजी दुपारी जाहीर होणार असल्याचे माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
पुणे : ज्यांना आरक्षण मिळतंय त्या सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे मुफ्ती मेहबूबा यांना वापरत काश्मीरमधील कलम ३७० काढून घेतलं त्याप्रमाणे सत्ता आल्यानंतर आरक्षण काढून घेतलं जाईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
सातारा : मी पक्षातून बाजूला गेल्यावर काही लोकांनी माझ्या नावाचा जपच सुरू केला आहे. मला मंत्रीपदाचा हव्यास असता तर मी मागच्याच निवडणूकीत राष्ट्रवादी पक्ष सोडला असता असे म्हणत शिवेंद्र राजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला चोख उत्तर दिले. राष्ट्रवादीत होतो तिथे प्रामाणिकपणे काम केले, आता भाजपमध्ये आहे इथेही प्रामाणिकपणेच काम करणार आहे, असेही शिवेंद्र राजेंनी म्हंटले आहे.
जालना: मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीवर उपाय म्हणून दुष्काळ मुक्तीच्या संकल्पने अंतर्गत मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मांडण्यात आली आहे. काल मुख्यमंत्र्याच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. जालना जिल्ह्यात सुरु करण्यात येणाऱ्या परतूरा मंठा वॉटर ग्रीड योजनेच्या मदतीने तब्बल 173 गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.
लातूर : पावसाअभावी निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईच्या कारणावरुन लातूरमध्ये या वर्षी सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार नाही. मोठया गणेश मूर्ती महानगर पालिकेकडे दान करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी घेतले आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सार्वजनिक गणेश मंडळाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर : शाहूनगरी’ कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव असणार्या छत्रपती शिवाजी चौक सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पूरपरिस्थितीमुळे स्मारकाचा लोकार्पण सोहळा साधे पद्धतीने करण्यात येणार आहे. रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सांगली : जत तालुक्यातील कोसारी येथे उपविभागीय पोलिस कार्यालयाने गांजा शेतीवर छापा टाकुन सुमारे तीन लाख चाळीस हजारांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिवाजी बाबा यमगर वय 40, दादासाहेब कटरे वय 60 अशी त्यांची नावे आहेत.
सोलापूर : शरद पवार यांचे राज्यात आता काही चालत नाही, हे समजल्याने भाजपात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादीतील नेत्याची धावपळ सुरू आहे. रामराजे निंबाळकर हे तर सर्व मत्र्यांचे उंबरे झिजवत असल्याची बोचरी टीका माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी केली आहे. परंतू पात्रता आणि लाईकी बघून त्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. जिल्हा नियोजन बैठकीसाठी निंबाळकर आले असता त्यांनी जे विधान केले आहे.
सोलापूर : शहरासह जिल्ह्यात गणरायाची स्थापना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर 12 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. गणेशोत्सव निमित्त शहराच्या विविध मार्गावरून मिरवणूक निघत असतात त्यामुळे त्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली आहे. तसेच शरतील गणेश विसर्जन कुंडाची पाहणी देखील केली. यावेळी त्यांच्यायसमवेत पालिकेतील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.