मुंबई | विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात्रांच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंनीही जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहे. आता आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरू आहेत. तसेच आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद मिळणार की नाही, अशाही चर्चा सुरू आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही एएम न्यूजशी बोलताना यावर सुस्पष्ट भाष्य केले आहे. ते म्हणाले आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री बनवायचे की नाही हा निर्णय त्यांच्या पक्षाला घ्यायचा आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेत नाही.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. दरम्यान यंदा शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार का? असा सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला जात आहे. दरम्यान, आता यावर फडणवीसांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री बनवायचे की नाही हा निर्णय त्यांच्या पक्षाला घ्यायचा आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेत नाही. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारा वेळीही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीसाठी तयारी दर्शवली होती. आता आदित्य ठाकरेंना करायचे की नाही हा त्यांचा निर्णय आहे, असे फडणवीस म्हणाले.
युतीविषयी काय म्हणाले फडणवीस?
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार का याविषयी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, मी पुन्हा येणार हे मी आधीच सांगितले आहे. तसेच अडीच-अडीच वर्षांचं काही समीकरण आहे का? याचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, असे काहीच नाही. नेमकं सत्तेविषयी काय करायचंय याविषयी आमची चर्चा झालेली आहे. अमित शाह, उद्धव ठाकरे आणि मी मिळून सर्व काही ठरवले आहे. योग्य वेळी आम्ही ते समोर आणू.
आदित्य ठाकरेंच्या जनादेश यात्रेविषयी काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंच्या यात्रेचा मला आनंद आहे. शिवसेनेचे भावी नेते ते आहेत. असा प्रकारच्या यात्रेतून तुम्हाला जनतेचा फिल योता. जनतेशी संवाद होतो. ते निवडणुकीत उतरले तर भाजप आदित्यसोबत ताकदीनिशी सोबत उतरेल. आदित्य निवडणूक लढवणार असतील तर त्यांनी लढवली पाहिजे. लोकशाहीमध्ये बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडला होता. त्यांनी संघटनेला बळकटी मिळण्यासाठी काम केले. तिसरी पिढी निवडणुकीत उतरत असतील तर स्वागत आहे.