आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेचे जळगावात जंगी स्वागत

जळगाव: शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज जळगावात आगमन होताच शिवसैनिक, युवासैनिक व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी जंगी स्वागत केले.

ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी नाही दिले, त्यांची मने जिंकायची आहेत असा विश्वास व्यक्त शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आज गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून होत आहे. या यात्रेसाठी आदित्य ठाकरे यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, विलास पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, युवासेना विस्तारक किशोर भोसले, कुणाल दराडे, महानगरप्रमुख शरद तायडे आदींसह शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: