आणि हा जिल्हा करावा ….खासदार नवनीत राणा यांची पंतप्रधानांकडे मागणी

दिल्ली: अमरावती च्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अमरावती आणि विदर्भाच्या विकासावर चर्चा केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची पी .एम. ओ . कार्यालयात भेट घेऊन अमरावती जिल्हा आणि विदर्भाच्या विकासावर केली चर्चा…

अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्ह्याची स्वतंत्र निर्मिती करणे , चिखलदर्याला महाराष्ट्रातील महाबळेश्वर,माथेरान या पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे, अमरावती येथील बेलोरा विमानतल तातडीने सुरु करणे.

अमरावती येथील नांदगाव पेठ पंचतारांकित एम आय डी सी मध्ये मोठे उद्योग आणणे , संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी करून पेरणी पासून ते कंपनी पर्यंत शेतकऱ्यांना आलेल्या खर्चापेक्षा मूळ किमतीच्या दीडपट भावाने राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाची डायरेक्ट खरेदी करावी, जेणेकरून शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल, विदर्भातील बंद पडलेले सिंचन प्रकल्प लवकर सुरु करून सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आजच्या २ च्या गुणकाप्रमाणे मोबदला द्यावा .

त्यांच्या परिवारातील २ व्यक्तींना नोकरी द्यावी, संजय गांधी ,श्रावण बाळ ,अंध अपंग तसेच विधवा निराधार महिलांना शासनाच्या योजनेअंतर्गत मिळणारे ६०० रू. अनुदानावरून २००० रुपये अनुदान करणे या प्रमुख मागण्यांसह १२ मुद्द्यांवर जवळ जवळ ४७ मिनिटे केली विकासात्मक चर्चा केली.

या सर्व मागण्या पी एम ओ कार्यालयातून कार्यान्वित होतील व लवकरच अमरावती जिल्हा आणि विदर्भाच्या विकासाला गती मिळणार असे खासदार नवनीत रवी राणा यांनी भेटीनंतर सांगितले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: