आघाडीला 175 पेक्षा अधिक जागा मिळतील – अजित पवार

मुंबई । राज्यात परिवर्तऩ अटळ आहे. सरकारच्या कारभारला त्रासलेली जनता या सरकारला खाली खेचणार असून राज्यात आघाडीचे सरकार येईल असा आशावाद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय. तसेच राज्यात आघाडीला 175 पेक्षा आधिक जागा मिळतील असं अजित पवार म्हणाले.

पंढरपूरमधील कॉंग्रसचे आमदार भारत भालके हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र स्थानिकांनी विरोध केल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये प्रवेश केला आहे.

 अजित पवार म्हणाले की, सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी लढवणार आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा सातारा जिल्हा आहे. यशवंतरावांनंतर शरद पवारांवर या जिल्ह्याने प्रेम केले. त्यामुळे आम्ही तिथे जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बारामतीत कोणीही उभं राहू शकतो, समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असचं समजून आम्ही निवडणूक लढवतो.

गोपीचंद पडळकर, चंद्रकांत पाटील उभे राहणार असतील तर बारामतीत त्यांचे स्वागत करतो. बारामतीतील उमेदवार 1 लाखाच्या मताधिक्याने विजयी करणारच असा दावा अजित पवारांनी केला आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: