नागपूर । दोन दिवस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आज नागपूरात पत्रकार परिषद घेवून परिस्थीतीवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, अवकाळीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, मात्र राजकीय घडामोडींमुळे दौऱ्याला उशीर झाला असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सरकारी आकडेवारीपेक्षा नुकसानीची वास्तविक आकडेवारी अधिक आहे. तसेच फळबागांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असल्याच मत यावेळी पवारांनी मांडले.
देवेंद्र फडणवीस यांना मी गेले काही वर्षांपासून ओळखतो आहे. मात्र ते ज्योतिष शास्त्राचे देखील अभ्यासक आहेत हे आता कळालं अस म्हणत त्यांनी त्यांच्या मी पुन्हा येईल या वक्तव्याचा समाचार घेतला. आम्ही धर्मांच्या विरोधात नाही. सेक्युलॅरीझमवर ठाम आहोत. एकसूत्री कार्यक्रमावर आमची चर्चा सुरू आहे अस मत महाशिवआघाडीवर मांडले. कर्जमाफीचा उल्लेख काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आहे. तसेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं गांभीर्य आहे का ही शंका आहे. अस म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केला. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी त्यांनी केद्रांकडे केली आहे.कृषी आणि अर्थ मंत्रालयाशी बोलणं करेन, इथे जर मदत नाही मिळाली तर पंतप्रधानांकडे जाऊ अस ठाम मत त्यांनी यावेळी मांडले.
दरम्यान, ‘मध्यावधी निवडणुकांची अजिबात शक्यता नाही. हे सरकार बनणार, पाच वर्ष चालणार याची आम्ही सारे काळजी घेऊ’, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी नागपूर प्रेस क्लब येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.