ग्लोबल न्युज नेटवर्क: विधानसभा निवडणुकीच्या धावपळीच्या काळात गेल्या आठ दिवसापासून राज्यातील राजकारण चांगलेच गरम झाले आहे.सुरुवातीला सेना-भाजप युती चर्चेत होती तर मागील चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रकाशझोतात आली आहे.
शरद पवार व अजित पवारांवर दाखल झालेला ईडीचा गुन्हा, राष्ट्रवादी चा आक्रमक पणा सुरू असतानाच माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांची देखील भर पडली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर त्यांचा मुलगा पार्थ पवार यांनी भावनिक ट्विट केले आहे.
शरद पवार यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेतल्यानंतर पार्थ यांनी ट्विट करत ‘आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आणि अत्यंत अवघड होता. वडिलांबरोबर झालेले संभाषण आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांना सांगितले आहे’, असे म्हटले आहे.
त्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पार्थ पवार यांनी अजित पवार यांनी मला राजकारण सोडण्याचा सल्ला दिला आहे. ते राजकारण सोडणार नाहीत, असे स्पष्ट केले होते, असे सांगितले.
शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्याविषयी माहिती दिली. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी मला कोणतीही कल्पना दिली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांनी आपल्या मुलांना राजकारण सोडण्याचा सल्ला देत कुटुंबीयांशी राजीनाम्याबाबत चर्चा केल्याचेही सांगितले होते.
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi