अनिल परब यांची तात्काळ मंत्री मंडळातून हकालपट्टी करा – अतुल भातखळकर
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
राज्यातील महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास दिला जाईल, त्यासाठी १० हजार बस सोडण्यात येतील, अशी घोषणा अनिल परब यांनी केली होती. मात्र त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढून फक्त स्थलांतरित नागरिकांसाठी एसटी सेवा सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.
मंत्री परब यांच्या फसव्या वक्तव्यामुळे काल राज्यात ठिकठिकाणी एसटीसाठी हजारो लोकांचा जमाव पाहायला मिळाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे दिशाभूल करणारं आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडेल, असं वक्तव्य केल्यामुळे अनिल परब यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करतो आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे नितेश राणेंनी परबांच्या अटकेची मागणी केलीय. चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत एबीपी माझाच्या पत्रकाराला अटक केली, आता अनिल परब यांना अटक होणार का?, असा सवाल राणेंनी विचारला आहे.