कणकवली । कॉंग्रेपासून फारकत घेतल्यानंतर स्वत: ची वेगळी चूल मांडणारे नारायण राणे आता भाजपावासी झाले आहे. मु्ख्यमंत्र्यांच्या उपस्थित त्यांनी भाजपात प्रवेश केला. याचवेळी त्यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत असल्याचे जाहिर केले. नारायण राणे हे यापूर्वीच राज्यसभेचे खासदार आहेत. राणेंबरोबर कणकवलीतील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या 65% मते नितेश राणेंना मिळतील हे लिहून ठेवा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विजयाची खात्री दिली. आक्रमकता हा नितेश राणेंचा स्वभाव कारण ते राणेंच्या शाळेत तयार झाले. पण नितेश आता आमच्या शाळेत त्यामुळे आता त्याना संयम बाळगण्याची गरज आहे. संयम आणि आक्रमकता असे दोन्ही गुण आता त्यांच्यात येतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
याचबरोबर येत्या दोन वर्षात सिंधुदुर्गात सी वर्ल्डचे राणेंचे स्वप्न पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.